फक्त रस्त्यांवरच नाही, तर सागरी वाहतुकीतही मोठा बदल घडणार आहे. फेरी सेवा अधिक पर्यावरणपूरक करण्यासाठी ५०% बोटी इलेक्ट्रिक करण्याचे लक्ष्य सरकारने निश्चित केले आहे.
या धोरणामुळे ४००० ते ५००० स्थानिक तरुणांसाठी रोजगाराचे दरवाजे उघडणार आहेत. वाहन दुरुस्ती, चार्जिंग स्टेशन, बॅटरी सेवा, व व्यवस्थापन यांसारख्या क्षेत्रात मोठी भरती अपेक्षित आहे.
या क्रांतीतून हजारोंना नोकरीच्या संधी उपलब्ध होणार असून, गोमंतकीय तरुणांना नव्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करण्याची मोठी संधी निर्माण होणार आहे.