पणजी : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर हे पुढील विधानसभा निवडणुकीपर्यंत या पदावर कायम राहिले, ईतर काँग्रेस पक्ष एकही जागा जिंकू शकणार नाही. असा गंभीर आरोप काँग्रेसचे माजी सरचिटणीस खेमलो सावंत यांनी केला आहे.
सावंत म्हणाले की, पाटकर कोणत्याही काँग्रेस सदस्याला प्रभावीपणे काम करू देत नाहीत, विशेषत साखळी मतदारसंघात. या कारणामुळे त्यांनी काँग्रेस पक्षातून बाहेर पडण्याचा विचार करत 'साखळी युवा मोर्चा' स्थापन करण्याची योजना आखली आहे.