पणजी : नॅशनल हेराल्ड प्रकरण हे १ नोव्हेंबर २०१२ रोजी यूपीए सरकारच्या काळात सुरू झाले होते. आता ईडीने काँग्रेस नेत्यांना चौकशीसाठी बोलावले आहे, तर काँग्रेस सहकार्य करण्याऐवजी स्वतःला पीडित दर्शवत आहे, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी केली आहे.

नाईक म्हणाले की, काँग्रेसचा ईडीविरुद्धचा आक्रमक आणि धमकीचा सूर आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो. कायद्याच्या चौकटीत चौकशी होणे आवश्यक आहे आणि कोणीही त्यापासून वाचू शकत नाही. भाजपने काँग्रेसवर राजकीय लाभासाठी जनतेच्या सहानुभूतीचा गैरवापर केल्याचा आरोप करत चौकशीला सहकार्य करण्याचे आवाहन केले.